Saturday, April 27, 2024
Homeदेशसहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिडणुकीच्या निकालाने भाजपची चिंता वाढली...

सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिडणुकीच्या निकालाने भाजपची चिंता वाढली…

Share

सहा राज्यांतील सात विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये भाजपला दिलासा दिला आहे. तर मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची भाजपने प्रत्येक्षपणे माघार घेतली मात्र या निवडणुकीत नोटा ला मतदान करण्याची अप्रतक्षपणे खेळी सुरूच ठेवली होती, शिवसेनेने अंधेरीत एकतर्फी विजय मिळवून शिंदे गटासह भाजपची गोची केली. तर तेलंगणात सत्ताधारी पक्ष टीआरएसला कडवी झुंज देऊन काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर ढकलण्यातही पक्षाला दिलासा मिळू शकतो. मात्र, बिहारमध्ये बरोबरी असली तरी या निकालाने भाजपची काहीशी चिंता वाढवली आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि भाजपने आपल्या जागा कायम ठेवल्या. मोकामा जागा आरजेडीने तर गोपालगंजची जागा भाजपने जिंकली. भाजपसाठी अडचण अशी आहे की मोकामा जागेवर, जिथे जेडीयूची मूळ मते आरजेडीकडे हस्तांतरित झाली होती, गोपालगंजमध्ये भाजपने दोन हजारांपेक्षा कमी मतांनी विजय मिळवला. तेही जेव्हा पक्षाने दिवंगत आमदार सुभाष सिंह यादव यांच्या पत्नी कुसुम देवी यांना उमेदवारी दिली होती.

एआयएमआयएम अब्दुल सलाम आणि बसपा उमेदवार इंदिरा यादव यांच्यामुळे गोपालगंज जागेवर भाजपचा किरकोळ विजय झाला. या दोन उमेदवारांनी राजदच्या मुस्लिम-यादव समीकरणाला मोठा धक्का दिला. सलाम यांना 12000 पेक्षा जास्त तर यादव यांना 8000 पेक्षा जास्त मते मिळाली. मात्र, मुस्लिम-यादव समीकरणात फूट पडली तरी भाजपचा उमेदवार राजदच्या उमेदवारापेक्षा दोन हजारांपेक्षा कमी मतांची आघाडी करू शकला. विशेष म्हणजे या जागेवर दिवंगत बाहुबली शहाबुद्दीन यांच्या बंडाची पर्वा न करता राजदने वैश समाजाचे मोहन गुप्ता यांना उमेदवारी दिली होती.

टीआरएससह काँग्रेसला संदेश
तेलंगणा हे भाजपच्या विस्तारित राज्यांपैकी एक आहे. मुनुगोडे जागा जिंकून पक्षाला सत्ताधारी टीआरएस तसेच काँग्रेसला मोठा संदेश द्यायचा होता. मात्र, येथे अत्यंत निकराच्या लढतीत पक्षाचा पराभव झाला. पराभव होऊनही पक्ष आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असल्याचा संदेश देऊ शकला. कारण या जागेवर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लोकशाही आणि युवकांचा विजय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, धामनगरमध्ये भाजपचा विजय हे राज्यात परिवर्तनाचे द्योतक आहे. हा लोकशाहीचा, तरुणांचा आणि महिलांचा विजय आहे.

जनमत चाचण्यांच्या आधारे गुजरातमध्ये AAP च्या आघाडीचा दावा करणाऱ्या आम आदमी पार्टीने हरियाणातील आदमपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत AAP साठी 68 टक्के आणि भाजपला 15 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवली होती. आदमपूरच्या निवडणूक निकालात हा अंदाज उलटाच ठरला आहे. ही पोटनिवडणूक भाजपने मोठ्या फरकाने जिंकली इतकेच नाही तर आप उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही एजन्सीचे गुजरातचे अंदाज ट्विटरवर शेअर केले होते. आता भाजप आपच्या गुजरात दाव्यावर आणि एजन्सीच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: