Saturday, May 4, 2024
Homeराजकीयखासदार संजय राऊत यांच्या 'या' विधानाने खळबळ...म्हणाले...

खासदार संजय राऊत यांच्या ‘या’ विधानाने खळबळ…म्हणाले…

Share

न्युज डेस्क – शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत, दरम्यान आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली असता शिंदे गटात लवकरच स्फोट होईल, असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच शिंदे गटात गेलेल्या आमदार-खासदारांनी पुन्हा निवडून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

राऊत पुढे म्हणाले “काही आमदार सोडून गेले म्हणून शिवसेना संपली, असं होत नाही. ४० नेते गेले तरी, पक्ष जमीनीवर आहे. महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी तुम्ही निवडणुका घेतल्या, तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही”, असेही ते म्हणाले.

“लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड”
“नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातले जे खासदार-आमदार शिंदे गटात गेले आहेत, त्यांनी परत निवडून दाखवावे. खासदार गोडसे यांची राजकीय कारकीर्द संपली आहे. आम्ही सतत लोकांमध्ये फिरतो आहे. लोकांच्या मनात गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. कालपासून मी नाशिकमध्ये आहे. येथे सर्वांना भेटतो आहे. लोकं त्यांना खोकेवाले बोलतात”, अशी टीकाही त्यांनी केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: