Thursday, May 9, 2024
Homeमनोरंजननाटक हे समाजाला सुधारणेचा संदेश आहे - अविनाश स्वामी...

नाटक हे समाजाला सुधारणेचा संदेश आहे – अविनाश स्वामी…

Share

मुंबई – गणेश तळेकर

” बदामाची गोष्ट ” या नाटकाच्या निमित्ताने मंगळवार दि. १२ मार्च २०२४. रोजी ” शिवाजी नाट्य मंदिर ” मध्ये ” अखिल भारतीय भंडारी महासंघ ” चे अध्यक्ष – श्री. नविनचंद्र बांदिवडेकर साहेब खास गोव्यातून नाटक पाहण्यासाठी आले होते.
नाटकाच्या मध्यांतरात त्यांचा सन्मानपूर्वक ” बाळगंगा पडवणे श्रमसंघ ” चे अध्यक्ष – प्रकाश दरवेशी आणि नाट्यसमीक्षक – सु. बा. सरपडवळ यांच्या हस्ते यतोच्छ सत्कार करण्यात आला.

त्याच बरोबर कवी- विसूभाऊ बापट यांचाही सन्मान करण्यात आला आणि श्री. स्वामी समर्थ भक्तभक्त- अविनाश स्वामी यांचा सुध्दा बाळा चौकेकर व किशोर वेल्हे यांच्या हस्ते गौरवपुर्क सत्कार करण्यात आले.

त्याचबरोबर नाटकातील सर्व कलाकारांचा ट्रॉपी देऊन सत्कार करताना समूहाने आनंद व्यक्त केला तेव्हा सदर नाट्यगृहातील रसिक प्रेक्षकांनी हा आनंद पुरेपूर घेऊन ” बदामाची गोष्ट ” नाटकाला छान प्रतिसाद दिला हे टाल्यांच्या कडकडाटात नाटक पाहताना जाणवले! –  अशोक शिंदे


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: