Sunday, May 5, 2024
Homeसामाजिकडॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं अकोल्याच्या परिषदेतील गाजलेलं भाषण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचं अकोल्याच्या परिषदेतील गाजलेलं भाषण…

Share

उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड व डॉक्टर किशोर वानखडे यांनी संपादित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विदर्भातील गाजलेली भाषणे या पुस्तकात पश्चिम विदर्भात बाबासाहेबांची गाजलेली भाषणे या पुस्तकात सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पश्चिम विदर्भात आतापर्यंत पाच वेळा येऊन गेले त्यापैकी दोन वेळा अमरावती दोन वेळा अकोला आणि एकदा बुलढाणा जिल्ह्यातील पातुरडा येथे. या सर्व भाषणांचा संदर्भ त्यांनी या पुस्तकात दिला आहे…या पुस्तकात अकोल्यातील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले?…ते पाहूया…

वऱ्हाड प्रांतिक शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनची परिषद अकोला वऱ्हाड अकोला येथे ता. ९ व १० डिसेबर १९४५ रोजी भरली होती. या परिषदेला अमरावती, यवतमाळ, अकोला व मध्यप्रांत अशा दुरदुरच्या ठिकाणावरून शेकडो प्रतिनिधी उपस्थित झाले होते. परिषदेला पाऊण लाख लोक हजर होते. परिषदेचे वैशिष्टे अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रथमच आगमन असल्यामुळे वऱ्हाड प्रांतातील चारही जिल्ह्यातील हजारो स्त्री-पुरूष बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता आले होते. काही भागातून दोन दिवसांचा प्रवास करूनही लोक आपल्या आवडत्या पुढाऱ्यांच्या दर्शनाकरिता व त्यांच संदेश ऐकण्याकरिता आले होते.

बाबासाहेब अकोल्याला येणार असल्याचे आगाऊ माहीत असल्यामुळे खास सिनेमातून अखिल भारतीय बहिष्कृत भारताचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ता.१० डिसेंबर १९४५ ला अकोल्याला उपस्थित राहुन भाषण करणार आहेत. अशा प्रकारची जाहिरात १० दिवसा अगोदर दाखविली जात होती. थोडक्यात बाबासाहेबांच्या आगमनाविषयी संबंध अकोल्यातील जनतेलाच नव्हे तर वऱ्हाड प्रांतातील जनतेला आमचे अनभिषिक्त राजे, आमचे पुढारी आम्हाला कधी भेटतील अशी उत्कंठा लागुन राहिली होती. अकोल्यात येईपर्यंत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या ठिकाणी हार्दिक स्वागत झाल्यामुळे त्यांना संबंध रात्रभर त्रास झाला होता. प्रतिनिधींना मुलाखती व मध्यप्रांतातील पुढायांशी आगामी निवडणुकी संबंधी त्यांनी पाऊण तास चर्चा केल्यानंतर प्रमुख पुढाऱ्यांचा फोटो घेण्यात आला.

अकोला स्टेशनपासून प्रचंड मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणूकीची लांबी तीन चार फलांग होती. अकोला स्टेशन ते टिळक मैदानापर्यंतचा रस्ता स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. या मिरवणूकीत अखिल भारतीय शेड्युल्ड कास्टस फेडरेशनचे उत्साहीत जनरल सेक्रेटरी श्री. राजभोज, अध्यक्ष सुवय्या, म्यु कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. सज्जनसिंग, शांताबाई दाणी वगैरे प्रामुख्याने दिसत होते.

वऱ्हाड प्रांतातील जिल्हयातील समता सैनिक दलाने या मिरवणूकीत उत्साहाने भाग घेऊन उत्तम प्रकारे शिस्त सांभाळली होती. दुतर्फा सैनिकदल मधोमध पुढाऱ्यांच्या मोटारी, मागे महिला मंडळ व इतर जनसमूह व सर्वाच्या आघाडीला नानाविध वाद्यांचे ताफे आणि मर्दानी दांडपट्ट्यांचा खेळ आणि बॅण्ड अशा उत्साही थाटात व बाबासाहेबांच्या जयघोषात मिरवणूक चालली होती. मिरवणूकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोन है, दलितो के राजा है, “शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा विजय असो’, हरीजन नावाचा धिक्कार असो, “आंबेडकर जिंदाबाद”, थोडे दिन मे भीमराज वगैरे गगनभेदी घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.

अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूकी सांध्वी रमाबाई आंबेडकर नगरात विसर्जन पावल्यावर श्री. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी उभारलेल्या शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा झेंडा उंचावर जाऊन फडकला.जयघोषात वातावरण दुमदुमले गेले होते. समता सैनिक दलाची परिषद श्री. सुबय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्यावर लगेच महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सौ. गीताबाई गायकवाड व मिसेस नाईक यांनी महिलांना स्फुर्तिदायक आदेश दिल्यावर परिषदेचे कामकाज संपले. बरोबर ५:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडपात आगमन झाले. त्यावेळी गगनभेदी घोषणांनी व टाळयाच्या कडकडाटांनी सारे वातावरण हर्षोत्फुल्ल झालेले होते. ध्यैर्यनिष्ठेने ओथंबलेल्या त्या अस्पृश्य वर्गाचा त्यावेळी स्वाभिमान व स्वावलंबन त्याचे हे दिव्य प्रतिक पाहुन स्वधर्मीय व विधर्मिय लोकांच्या तोंडुन आपोआप धन्योध्दार बाहेर पडत होते.

परिषदेचे कामकाज

परिषदेची सुरूवात बरोबर ६:३० वाजता नागपुरचे शिंदे वकील यांनी आपल्या सुस्वर गायनाने केली. स्वागताध्यक्ष श्री. डी.झेड. पळसपगार यांनी आपल्या भाषणात जमलेल्या मंडळीचे व बाबासाहेबांचे स्वागत केले. नंतर अकर्ते वकील (काँग्रेस), अमृतकर वकील (हिंदु महासभा),

म्युनिसीपल कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब आठल्ये, मुस्लिम लीगचे सभासद श्री. काझी वकील यांनी बाबासाहेबांची मुक्तकंठाने स्तुती करून बाबासाहेब हे केवळ अस्पृश्यांचेच ठरत नसून अखिल भारताचे ते पुढारी तपस्वी आहेत. अशा तऱ्हेची घोषणा करून बाबासाहेबांच्या चळवळीविषयी व फेडरेशन पक्षाविषयी आदर व्यक्त केला.

नंतर डिस्प्रेस्ड क्लासेस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब ठवरे यांनी आपण हा पक्ष सोडून फेडरेशन पक्षामध्ये शामिल कसे झालो या संबंधी उल्लेख करून आपले भाषण संपविले तद्नंतर श्री. इंगळे यांनी अखिल वऱ्हाड प्रांतातील अस्पृश्य जनतेतर्फे मानपत्र वाचून दाखविले. नंतर डॉ. बाबासाहेबांना ११०१ रूपयांची थैली अर्पण करण्यात आली.

बरोबर ७:३० वाजता डॉ. बाबासाहेब बोलायला उभे राहीले यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन ‘आंबेडकर जिंदाबाद’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कौन है, दलितो के राजा है, वगैरे गगनभेदी जयघोष सारखा चालला होता. जनसमुदाय पुन्हा शांत झाल्यावर बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले ते म्हणाले,

विषय :- आपण अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उध्दार शक्य तरी आहे काय ?

बंधु आणि भगिनींनो!
आतापर्यंतच्या वक्त्यांनी जी भाषणे केली आहे, त्यावरून माझी भुमिका स्पष्ट झाली आहे. तेव्हा त्याचे संबंधी मी चर्वीतचर्वन न करता इलेक्शन संबंधी बोलणार आहे. तुम्हाला माहीत आहे की, यावेळेचे इलेक्शन म्हणजे १९३७ सालचे इलेक्शन नाही. यावेळचे इलेक्शन म्हणजे अस्पृश्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, हा प्रश्न सोडवून आपल्या जिवीतोच आद्यकर्म आपण बजाविले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे. अर्थातच फेडरेशनच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजे.

राजकीय सत्ता हवा हाती, असली म्हणजे मनुष्य काय करू इच्छिते याचे मी उदाहरणे सांगतो. मी व्हॉइसरॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे १५ सभासद आहे. मी तिथे एकटाच आहे या गोष्टीला अडीच वर्षावर कालावधीत मी तिथे राहुन काय केले हे सांगितले म्हणजे उलगडा होईल. मी तेथे जाण्यापूर्वी मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसलीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती मात्र मुसलमानांच्या विश्वविद्यालयाला २० लाख रूपयांची मदत देऊन व बनारस हिंदू विश्वविद्यालयाला १९ लाख रूपये भांडवल सहाय्य केले आहे. शिवाय दोन्हीही संस्थाना सालाना तीन लाखाची मदत पुरवून चालुच आहे.

मी तेथे आल्या नंतर सरकारने अस्पृश्याकरिता तीन लाख रूपयांची मदत चालू केली आहे. शिवाय ३०० कॉलेजला शिष्यवृत्त्या प्रत्येक ६० हजारांच्या मंजुर झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जर मदत द्यावयाची तर ती भरपूर द्यावयाचे असे धोरण आखले आहे. याच वर्षी ३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायतेत जातील. आता अशी व्यवस्था केली आहे की, निदान दोन वर्षात १५ विद्यार्थी विलायतेला येथुन जातील. याप्रकारची पूर्वी कधीही नसलेली ही व्यवस्था आज झाली आहे.

आता नौकरीसंबंधी पहा. मुसलमानांना शेकडा २०, खिश्चनांना शेकडा साडेआठ पण आपल्याला मात्र अशा प्रकारचे प्रमाण पूर्वी अजिबात नव्हते फक्त यांचेकडे लक्ष पुरवावे एवढीच शिफारस होती, पण नुकतीस माझी मागणी सरकारला पटून आमचेही नोकऱ्यात शेकडा आठ पूर्णांक एक तृतियांश असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. मी तेव्हा माझ्या खात्यात अस्पृश्यांचे हमाल सुध्दा नव्हते पण आता डेप्युटी सेक्रेटरी दोन, अंडर सेक्रेटरी १ व एक्झिकेटीव्ह इंजिनीयर ती असे अस्पृश्य वर्गाचे लोक भरलेले आहे कोणी म्हणतात की महाराचे हित करतो, मी महार जातीत जन्मलो याला मी काय करू? माझ्या विरूध्द केली जाणारी ही तक्रार खोटी आहे.

माझ्या खात्यात शिमल्याला २८ क्लार्कपैकी १८ भंगी आहे. विलायतेला जाणाऱ्या लोकांत एक मांग, एक भंगी व एक चांभार पुष्कळच आहेत. मी आणखी एक गोष्ट यातून सांगु इच्छितो एक मळकट असा भंगी अस्पृश्यांचा उमेदवार जेव्हा मुलाखतीकरिता शिमल्याला आला तेव्हा त्याला खात्रीने नकार मिळेल हे जेव्हा मला समजले तेव्हा बोर्डावर मी माझे वजन आणून त्याला निवडुन घेतले, आता तो उमेदवार परदेशात आहे.

मी स्वत:ची आत्मप्रौढी करतो असे मात्र समजू नका. सांगण्याचा हेतू हाच की, राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू शकतो आणि म्हणूनच अस्पृश्य समाजाला इज्जत व माणुसकीसाठी राजकारण काबीज करायला पाहिजे. म्हणजेच फेडरेशनच्या प्रतिनिधीला कायदेमंडळात जाऊन आमच्यावरील जुलुमांविरूध्द आवाज काढता आला पाहिजे ही एक आमची मागणी आहे. इ.स. १९२० साली गाधीजींनी हरिजन संघ काढला. या संघातून हरिजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचा उपक्रम सुरू केला. हेतु इतकाच की, आमच्या स्वाभिमानी चळवळी पासून आपल्या गोटात ओढणे या बाबतीत मी अस्पृश्य विद्यार्थ्यांना इतकेच सांगतो की, असल्या आमीषांचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या, पण कर्तव्याला जागा. हे तुम्हाला सांगावयाचे आहे. पुराणातील देव दैत्य यामध्ये जे युध्द झाले होते त्या युध्दाला यश येण्याकरिता कचाला संजीवनी मंत्र शिकविण्याची देवांची युक्ती काढुन सफलही केली. कचासारखी वृत्ती तुम्ही आपल्या कृतीत उतरून त्याचप्रमाणे वागा यातच समाजाचे हित आहे. या देशात असंख्य जाती व धर्म आहे.

यात सामाजिक समता अगर संघटना नाही. जाती जातीत रोटी भेद, बेटी व्यवहार होत नाही आणि कदाचित झालाच तर अपवाद ब्राम्हण मुलीने महार मुलांशी लग्न केले तर त्याबद्दल मला काही एक वाटणार नाही. पण मी असे विचारतो की, अशा तऱ्हेच्या विवाहाने अस्पृश्यांची अस्पृश्यता नाहीशी होईल काय? आमच्या मूली काय काळ्या आहे की नकट्या आहेत का कुरूप आहेत? मी असेही तुम्हाला विचारतो की, अस्पृश्यांनो स्पृर्श्य वर्गाच्या मुलीशी लग्न करण्यात मतलब काय? स्वराज्याच्या प्रश्नावर मतभेद नाही?

पण या स्वराज्यात आम्हाला आमचे हक्क प्राप्त झाले पाहिजे. तुमच्या स्वराज्यात आमच्यावर कुणाचे राज्य होणार या प्रश्नाचे उत्तर द्या, असे काँग्रेसला मला सांगावयाचे आहे. सध्या आपल्याजवळ कोणतेच साधन नाही. स्पृश्य लोक सत्ताधिश आहेत आणि म्हणून ते पाहिजेत त्या गोष्टी ठरवितात. काँग्रेस ही आपली हितशत्रु आहे. त्यांच्याजवळ मुबलक पैसा, वाहनाची साधने व इतर संसाधने आहेत ती आपल्या जवळ नाहीत या मोहाला आपल्यातील कितीतरी सहज बळी पडुन गेली आहेत. पण मी मात्र पडलो नाही तेव्हा मला तुम्हाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, अशा प्रकारच्या साधनांची अपेक्षा न करता आपल्या पक्षाचे कर्तव्य म्हणून, पायी जावून मताधिकार असेल त्यांनी विनामुल्य समाजसेवा घडावी. म्हणू फेडरेशनच्या उमेदवारालच मते द्यावी, हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. देशातील अल्पसंख्यांकांना वाटणारी भिती दुर करण्यासाठी झटत असल्याचे काँग्रेस म्हणते, पण तसे काहीच नाही. सर्व देशाचे प्रतिनिधी असा तिने चालविलेला प्रचार फसवणूक करणारा आहे. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा पाठींबा मिळावा म्हणून काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा हा प्रश्न आहे. ब्रिटीश निघुन गेल्यावर आणि स्वराज्य मिळाल्यावर निरनिराळ्या अल्पसंख्यांकांचे हक्क मध्यवर्ती सरकारात कसे संरक्षिले जातील याचा विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने इतर पक्षाला डावलले आणि आपल्या हाती सत्ता असावी असा दावा सुरू केला.

कॉंग्रेसचा हा दुराग्रह आम्ही काढुन टाकनार. काँग्रेसपासून अलिप्त राहण्यासंबंधी माझा तुम्हाला सल्ला आहे. आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्यांच्याविरूध्द काही तक्रार केली तर ती तक्रार देखील ऐकुन घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही काय करावे. तेव्हा मी म्हणतो, हे जरी खरे असले तर तो तुम्हाला असे आहेत? मी असेही तुम्हाला विचारतो की, अस्पृश्यांनो स्पृर्श्य वर्गाच्या मुलीशी लग्न करण्यात मतलब काय? स्वराज्याच्या प्रश्नावर मतभेद नाही? पण या स्वराज्यात आम्हाला आमचे हक्क प्राप्त झाले पाहिजे. तुमच्या स्वराज्यात आमच्यावर कुणाचे राज्य होणार या प्रश्नाचे उत्तर द्या, असे काँग्रेसला मला सांगावयाचे आहे.

सध्या आपल्याजवळ कोणतेच साधन नाही. स्पृश्य लोक सत्ताधिश आहेत आणि म्हणून ते पाहिजेत त्या गोष्टी ठरवितात. काँग्रेस ही आपली हितशत्रु आहे. त्यांच्याजवळ मुबलक पैसा, वाहनाची साधने व इतर संसाधने आहेत ती आपल्या जवळ नाहीत या मोहाला आपल्यातील कितीतरी सहज बळी पडुन गेली आहेत. पण मी मात्र पडलो नाही तेव्हा मला तुम्हाला हे स्पष्ट सांगायचे आहे की, अशा प्रकारच्या साधनांची अपेक्षा न करता आपल्या पक्षाचे कर्तव्य म्हणून, पायी जावून मताधिकार असेल त्यांनी विनामुल्य समाजसेवा घडावी. म्हणू फेडरेशनच्या उमेदवारालच मते द्यावी, हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे.

देशातील अल्पसंख्यांकांना वाटणारी भिती दुर करण्यासाठी झटत असल्याचे काँग्रेस म्हणते, पण तसे काहीच नाही. सर्व देशाचे प्रतिनिधी असा तिने चालविलेला प्रचार फसवणूक करणारा आहे. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा पाठींबा मिळावा म्हणून काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा हा प्रश्न आहे. ब्रिटीश निघुन गेल्यावर आणि स्वराज्य मिळाल्यावर निरनिराळ्या अल्पसंख्यांकांचे हक्क मध्यवर्ती सरकारात कसे संरक्षिले जातील याचा विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने इतर पक्षाला डावलले आणि आपल्या हाती सत्ता असावी असा दावा सुरू केला. कॉंग्रेसचा हा दुराग्रह आम्ही काढुन टाकनार. काँग्रेसपासून अलिप्त राहण्यासंबंधी माझा तुम्हाला सल्ला आहे.

आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्यांच्याविरूध्द काही तक्रार केली तर ती तक्रार देखील ऐकुन घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही काय करावे. तेव्हा मी म्हणतो, हे जरी खरे असले तर तो तुम्हाला असे विचारतो की, शेळी होऊन अशा प्रकारचे आयुष्य किती दिवस आणखी कंठणार? कधी ना कधी तर अन्याविरूध्द तोंड काढावे लागणार. आपण जर या अन्यायाचा प्रतिबंध केला नाही तर आपला उध्दार होणे शक्य तरी आहे काय? मी तुम्हासमोर कोट, बुट, पाटलोण घालुन उभा आहे. माझ्या हातांत सोन्याचे घड्याळ आहे. मी स्वच्छ आहे, मला महार म्हणण्याची कोणाची ताकद आहे काय? तरी पण मी महार आहे. ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मी जर कच खाल्ली असती तर ही स्थिती प्राप्त झाली असती काय? माझ्या हातात सोन्याचे घड्याळ दिसते ते दिसले असते काय? तेव्हा सांगण्याचा मतलब हा की, अन्यायाच्या विरूध्द तुम्ही लोकांनी ‘जशाच तसेच या न्यायाने प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कर्तव्याला जागरूक करा. तेव्हा मला तुम्हाला शेवटी इतकेच सांगावेसे आहे की, या पुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे. त्या करता आपण आपली तयारी भक्कम पायावर केली पाहिजे आणि आपल्या फेडरेशनच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावयाला पाहिजे. हिंदुस्थान सरकारने, प्रांतिक विधिमंडळाचे निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून घटना समिती निवडली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या समितीकडून घटना तयार होईल. ती घटना बऱ्याच वर्षाकरिता अस्तित्वात राहिल कदाचित ती कायमसुध्दा होईल. काँग्रेसने आपल्या काही जागा पटकविल्या तर आपले नुकसान होईल आणि म्हणून आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता येणार नाही. त्याकरिता अहोरात्र प्रयत्न करून आपल्या सर्व जागा काबीज केल्या पाहिजेत इतका तुम्हाला आदेश देऊन मी माझे भाषण संपवितो.

संदर्भ :-कांबळे, अॅड. स्मिता डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
समग्र भाषण संग्रह इ.स. २०१९, पृष्ठ ७७५- ७७८…


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: