Homeराज्यवारकऱ्यांना लाठीमार करणे अत्यंत खेदाची बाब - वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल...

वारकऱ्यांना लाठीमार करणे अत्यंत खेदाची बाब – वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील

Share

सांगली – ज्योती मोरे

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. वारकरी आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांना अडवून धक्काबुक्की करत लाठीमार करणे हे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडले नाही. ही अत्यंत खेदाची बाब असल्याने वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी निषेध केला.

दरम्यान वारकरी प्रेमाने जिंका लाठीने नको,महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या विषयावर भाष्य करावं आणि पोलिसांना तशा सूचना द्याव्यात.अन्यथा या परंपरेचा अपमान सहन करणार नसल्याचा इशाराही विठ्ठल पाटील यांनी पुढे बोलताना दिला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: