Saturday, June 15, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीअमरावती | कृषी सेवा केंद्र संचालकास शिवसैनिकांनी दिला चोप...युरियाचा काळाबाजार करण्याचा आहे...

अमरावती | कृषी सेवा केंद्र संचालकास शिवसैनिकांनी दिला चोप…युरियाचा काळाबाजार करण्याचा आहे आरोप…

अमरावती : पाउस पडेना! या चिंतेत असलेला शेतकऱ्यांना आता बियाणे केंद्रावर त्रास दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. तर साठेबाज कृषी केंद्रावरील संचालकांना धारेवर धरण्याचे काम शिवसैनिक करीत आहेत. आज शहरातील कृषी समृद्धी या कृषी केंद्रात धुडगूस घालून कृषी केंद्र संचालकास मारहाण केली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना आवश्यक असणारे बियाणे चक्क उपलब्ध नाही असे सांगून त्याचा काळाबाजार केला जात असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक राहुल माटोडे आणि सुनील राऊत यांच्याकडे केली. यामुळे राहुल माठोडे सुनील राऊत आणि शहरातील उद्योजक नितीन मोहोळ यांनी शहरात कृषी केंद्र असणाऱ्या परिसरात जाऊन गोंधळ घातला. कृषी समृद्धी या कृषी केंद्राचे संचालक राठी यांच्याशी हुज्जत घालत सुनील राऊत यांनी चक्क त्यांना मारहाण केली. या संपूर्ण प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली. कृषी केंद्र संचालकाला मारहाण झाल्यामुळे शहरातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी आपली दुकान बंद करून थेट शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले.

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त विक्रम साळी हे शहर कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले.परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीने यावेळी खबरदारी घेण्यात आली. समृद्धी कृषी केंद्राचे संचालक राठी यांनी झाल्या प्रकाराबाबत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकारात राहुल माटोडे, सुनील राऊत आणि नितीन मोहोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

बळीराजा हतबल असताना सरकार त्यांच्या त्यांच्या प्रति अस्ववेदनशील असून अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कृषी केंद्र संचालक युरियाचा काळाबाजार करीत आहेत. कृषी केंद्रात युरिया खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अव्वाच्या संवादात पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे राहुल माटोडे यांनी केला. युरियाची मूळ किंमत ही 283 रुपये असून 400 ते 500 रुपये दराने त्याची विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती शहरात खोटे बी बियाणे पकडले गेले. या सर्व प्रकाराची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे साठे-लोटे आहे. या गैरप्रकारचा संबंध थेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा आरोप करीत आम्ही या कृषी केंद्र संचालकांना धडा शिकवण्यासाठी त्यांना चोप दिला. यापुढे शेतकऱ्यांची अशीच लुबाडणूक करण्यात आली तर हे कृषी केंद्र संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची दिंड काढण्यात येईल असा इशारा देखील राहुल माटोडे यांनी यावेळी दिला.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: