अकोला – अमोल साबळे
निंबा फाटा, कारंजा रमजानपुर, अंदुरा,हाता, नया अंदुरा, शिंगोली,निंबा, मोखा, बहादुरा, कवठा, निंबी, जानोरी, अंञी, उरळ, मोरगाव, हातरूण, लोहारा परिसरातील शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन, तूर, कपाशी या पिकासाठी पीक विमा काढला परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकासाठी विमा मंजूर केला. असून, नया अंदुरा परिसरातील नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना विमा भरपाई प्रतीक्षा कायमच आहे.
गतवर्षीच्या सण २०१९-२०२० या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी विविध पिकाचा विमा उतरविला त्यासाठी विमा कंपनीकडे संबंधित बँकेमार्फत विम्याची रक्कमही भरली. त्यात नया अंदुरा परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस पिकाचा विमा उतरविला होता त्याच्या पावत्याही संबंधित शेतकऱ्याकडे आहेत.
त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर दरम्यान आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, तूर आणि कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले तर जुलैमधील अतिवृष्टी मध्ये उडीद व मुंग पिकाचे नुकसान झाले होते. या पीक नुकसानाचा सर्वे प्रशासकाने केला.
त्यानंतर शासनाने नुकसाणग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही मंजूर केली. तथापि यात केवळ सोयाबीन, मुग व उडीद शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यात आली. त्यामुळे निंबा फाटा, परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी पिक नुकसान होऊनही मदतीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत.
या संदर्भात शेतकरी संबंधितांकडे चौकशी करित असताना कापूस उत्पादकांना पीकविमा मंजूरझ करण्याची प्रक्रिया सुर असल्याचे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे निंबा फाटा परिसरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ विमा कंपनीने शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी शिवसेना नेते उमेशभाऊ जाधव यांनी केली आहे.