Thursday, April 25, 2024
HomeBreaking Newsअमरावती | ट्रक ने टाटा एसला उडविले...५ प्रवाश्यांचा जागीच मृत्यू...दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील घटना...

अमरावती | ट्रक ने टाटा एसला उडविले…५ प्रवाश्यांचा जागीच मृत्यू…दर्यापूर-अंजनगाव मार्गावरील घटना…

Share

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत येत लेहगाव जवळ कालरात्रीच्या सुमारास आयसर ट्रक आणि टाटा एस वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती. अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहे. तर टाटा एस मध्ये 12 प्रवाशी प्रवास करीत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा एस मध्ये बसून १२ प्रवासी प्रवास करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक ने टाटा एस ला जबर धडक दिली.यात ५ जणाचा मृत्यू झालाय. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती हलविण्यात आले आहे. यात लहान मुलाचा देखील समावेश आहे.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तातडीने त्यांनी रुग्णालयात हलविले आहे. यासंदर्भात अधिक तपास खल्लार पोलीस करताहेत.अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व जण टाटानगर बाबडी येथील आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये 2 लहान मुले 2 महिला एका पुरुषांचा समावेश आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: