Thursday, May 2, 2024
Homeराज्यरमेश तात्या गालफाडे यांची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर चेअरमन पदी नियुक्ती...

रमेश तात्या गालफाडे यांची साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर चेअरमन पदी नियुक्ती करावी…

Share

बीड – शितल कुमार जाधव

बीड येथे मातंग समाज परिवर्तन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या या मातंग समाज परिवर्तन सभेला बीड जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते मातंग समाजाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम बीड येथे मातंग समाज परिवर्तन मेळाव्याचे दिनांक 29 तारखेला आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यू भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष प्रभाकर लोंढे उपस्थित होते. हा कार्यक्रम तर प्रमुख अतिथी मध्ये माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे या पण परिषदेत उपस्थित होत्या मातंग समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी मातंग समाजामध्ये एक उगवता सूर्य म्हणून संपूर्ण मातंग समाज रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी सज्ज असून समाजाला कुठेतरी न्याय देण्याचे काम रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून होऊ शकेल मातंग समाजाच्या अडचणीमध्ये वरची वर भर होत,

असून भारत देश स्वतंत्र झाल्यापासून मातंग समाजावर अन्याय अत्याचार होताना आजपर्यंत दिसत आहे मातंग समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून एक मातंग समाजाला योग्य नेतृत्व लाभलेला आहे मातंग समाजातील वेगवेगळ्या समस्यावर रमेश तात्या गालफाडे बोलत होते रमेश तात्या गालफाडे हे एक मातंग समाजाचा उगवता सूर्य आहे.

रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून एक मात्र समाजामध्ये उभारी निर्माण झाली कुठेतरी मातंग समाजाला न्याय मिळेल त्यांच्या माध्यमातून एक मातंग समाजाला आशेचा किरण लाभलेला आहे रमेश तात्या गालफाडे यांच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना दिसत आहे संपूर्ण मातंग समाजातील जनतेने व मातंग समाजाने असे ठरविले आहे.

रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातला समाज उभा असून मातंग समाजाच्या समस्यावर या कार्यक्रमात चर्चा झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावरील होणारा अन्याय अत्याचार कदापिही सहन केला जाणार नाही असे मत कोमल ताई ढोबळे यांनी केले संपूर्ण राज्यातून व बीड जिल्हा मातंग समाजाच्या वतीने रमेश तात्या गालफाडे यांची अण्णाभाऊ साठे महामंडळावर नियुक्त करावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून लावून धरली जात असून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून बीड येथे मातंग समाज परिवर्तन परिषदेचे शीतलकुमार जाधव यांनी आयोजन केलेले होते.

या कार्यक्रमाच्या वतीने माध्यमातून समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी रमेश तात्या गालफाडे यांचे हात बळकट करण्यासाठी संपूर्ण मातंग समाज रमेश तात्या गालफाडे यांच्या पाठीमागे उभा असून संपूर्ण मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावर रमेश तात्या गालफाडे यांची नियुक्त करावी अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून जोर धरत आहे तरी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी संपूर्ण मातंग समाजातील जनतेचा मान राखून मातंग समाजाचे एक उभरते नेतृत्व समाजाला एक वेगळी दिशा देण्याचे नेतृत्व रमेश तात्या गालफाडे यांची महामंडळावर शासनाने नियुक्त करावी अशी विनंती बीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे मातंग समाज परिवर्तन परिषदेत करण्यात आली या परिषदेचे आयोजन राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शितल कुमार जाधव व बीड जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला या परिषदेत मातंग समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: